संदेश

मार्च, 2021 की पोस्ट दिखाई जा रही हैं

शायरी

 "अगर कोई आपसे कहे, की तुम बदल गए हो, तो उनसे साफ साफ कह देना, की "बदलाव तो सृष्टी का नियम है" और हम... कभी कोई नियम नहीं तोड़ते|"🤞🤞                                            -अंकिता घुगे.

हरवलेले बालपण

 लहान असताना नेहमी वाटायचं, की केव्हा एकदाचे मोठे होऊ, आणि कधी येईल ते शहाणपण, पण आता मोठं झाल्यावर जाणवतंय, की नको हे जबाबदारीचं ओझं  बरं होतं आपलं तेच निरागस " बालपण" . किती मस्ती करायचो, किती खेळ खेळायचो, कधी लपंडाव तर कधी विटी-दांडू, आणि पकडा-पकडी तर बेधुंद होऊन पळायचो. ती शाळेत केलेली निस्वार्थ मैत्री, आणि बाईंच्या छडीला घाबरून केलेला तो अभ्यास, ना कोणत्याही सुख-दुःखाची जाणिव, असायचा फक्त त्या निरागस जीवनाचा ध्यास. ती मित्र-मैत्रिणींसोबत केलेली मस्ती आणि अधूनमधून केलेली ती भांडणं, "ह्यानेचं माझं नाव घेतलं", हे लगेच जाऊन आई बाबांना सांगणं. किती गोड असतात ना या बालपणीच्या आठवणी पण, कितीही आठवल्यात ना तरी कधीच भरत नाही हे आपलं मन. पण मनाला एक आनंद वाटतो, की आम्ही तरी आमचे बालपण जगले, पण आजच्या मुलांचे काय? त्यांचं बालपण तर कुठे तरी हरवून बसलयं कारण, त्यांच्या बालपणापेक्षा जास्त शिक्षणाचे आणि मोबाईलचे वर्चस्व वाढले.                                          -अंकिता घुगे.

कविता

 "मनातील भावना व्यक्त करण्याचा मार्ग म्हणजे " कविता", अनूभवातील बोल शब्दांत मांडण्याचं साधन म्हणजे " कविता", आपल्याला होणारा आनंद, दुःख, त्रास हे सर्व व्यक्त करण्याचा पर्याय म्हणजे " कविता", ज्या गोष्टी लोकांना समजत नाही, त्या सांगाव्या तरी कोणाला? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे " कविता", एकंदरीत, मनात असलेलं विचारांचं वादळ थांबवण्यासाठीचा प्रयत्न म्हणजे " कविता ."                                          -अंकिता घुगे.

शायरी

 "इतनी सस्ती तो नहीं मेरी हॅंसी, कि, किसी के कुछ कहने पर मैं हॅंसना ही छोड़ दूॅं, और इतनी कमजोर भी नहीं मैं, कि, एक बार हार जाऊॅं, तो कोशिश करना ही छोड़ दूॅं|"                                 -अंकिता घुगे.

शायरी

 "जिंदगी में खुशी चाहते हो, तो गम सहने पडेंगे, होंठो की हॅंसी चाहते हो, तो दर्द भी सहने पडेंगे, क्योंकी, सोने को भी चमकने से पहले तपना पड़ता है, और अगर आपको भी चमकना है, तो जिंदगी के घाव तो सहने ही पडेंगे|"                                        -अंकिता घुगे.

शायरी

 "ऐसा कोई इंसान नहीं, जिसके पास दिल न हो, ऐसी कोई कष्टी नहीं, जिसका कोई साहिल न हो, और दुनिया में ऐसा कुछ भी नहीं, जो तुम्हें हासिल न हो, बस तुम कोशिश करना मत छोड़ना, क्योंकी ऐसी कोई राह नहीं, जिसकी कोई मंजिल न हो|"                                    -अंकिता घुगे.

उगाच पाण्याला जीवन म्हणत नाही...!

 गेला तो हिवाळा आणि आला आता उन्हाळा म्हणजे पुन्हा सुरू होणार ती पाणी टंचाई, पाणी होतं तो पर्यंत काही वाटलं नाही पण या भर उन्हाळ्यात मात्र आता जपून पाणी वापरावं लागेल बाई. म्हणतात ते खोटे नाही, की वस्तूची किंमत ती दूर गेल्याशिवाय कळत नाही, आणि आता या कडक उन्हाळ्यात ही लोकांना पाण्याचं महत्त्व समजल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाने वापरावे जपून पाणी ही आपली आहे एक जबाबदारी, टाळावी नासाडी पाण्याची घ्यावी सर्वांनी ही खबरदारी. अन्नाशिवाय जगू शकतो मनुष्य काही दिवस परंतु, पाण्याशिवाय जगणं कठीण आहे मनुष्याला, म्हणून जाणा महत्त्व पाण्याचे कारण पाण्याशिवाय अर्थ नाही या आयुष्याला. जेवढे महत्त्व पाण्याचे मनुष्याला नाही तेवढे हे पाणी महत्त्वाचे पशू-पक्ष्यांसाठी आहे, कित्येक पशू-पक्षी पाण्याविना जीवाला मुकतात याची जाणीव तरी कोणाला आहे? धरणीच्या पोटात ही आता कोरड पडू लागली आणि भर उन्हाळ्यात जाणवू लागला पाण्याचा तुटवडा, आता पुन्हा टॅंकर भोवती जमा होणार गर्दी, नाहीतर बायका निघणार पायी शोधवयास एखादी नदी किंवा ओढा. असंख्य शोध लावलेत वैज्ञानिकांनी परंतु, अजून पाणी तयार करता आले नाही, म्हणूनच पाणी हे अम...

चला... स्वतःला शोधूया

 आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीला आपण आपला किमती वेळ देतो, पण कधी स्वतःला तेवढा वेळ दिला आहे का? आपण नेहमी दुसर्यां-वरच जास्त प्रेम करतो, पण कधी स्वतःवर प्रेम करून बघितलं आहे का? दुसर्यां-वर प्रेम करून काय मिळतं हो...? शेवटी निराशाच येते ना वाट्याला, पण कधी तरी स्वतःवर ही प्रेम करून बघा खरंच सांगते, विसरून जाल तुम्ही या जगाला. आपण त्या गोष्टींना जास्त प्राधान्य देतो ज्या लोकांना हव्या असतात, पण आपण त्या गोष्टी कधीच करत नाहीत ज्या आपल्या मनाला आवडतात. याचं कारण एकच, "लोक काय म्हणतील" या गोष्टीचा आपण जास्त विचार करतो, आणि स्वतःला काय आवडतं, हा विचार मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दाबलेला असतो. हो... पण अशीही माणसं असतात हं जी आपलं आयुष्य मनसोक्त जगतात, कारण, लोकांवर वेळ वाया घालण्याऐवजी ती माणसं स्वतःला जास्त वेळ देतात. याचा अर्थ असा नाही, की स्वार्थी आणि बेफिकीर होऊन जगावं, हो पण, लोकांच्या गर्दीत न हरवता कधी तरी मनाचं ही थोडंसं ऐकावं. जेवढा वेळ तुम्ही स्वतःला द्याल ना तेवढेच तुम्ही स्वतःला समजू शकाल, आणि जेवढं प्रेम स्वतःवर कराल ना तेवढेच तुम्ही आनंदी रहाल. मग आजपासून एक निश्चय...

जेव्हा ती येते...

 महिन्याचा प्रवास करून चार दिवस पाहुणी येते, माझ्या मनात तर खूप प्रश्न निर्माण होतात जेव्हा "ती" येते... आई म्हणते... मंदिरात जाऊ नकोस तू अशुद्ध आहेस पण मुळात समाजाचे विचारच बेशुद्ध पडले आहेत, असे मला वाटते जेव्हा "ती" येते... जर "ती" च्या येण्याने एक स्त्री अशुद्ध होते, आणि जर "ती" च्या अस्तित्वामुळेच एका बाळाला नवे आयुष्य मिळते, तर ते बाळ नेमकं शुद्ध की अशुद्ध? हाच प्रश्न मी आईला विचारते जेव्हा "ती" येते... आजी म्हणते... मला हात लावू नकोस नाहीतर होईल मला शिवपालव, अहो... शिवपालव वगैरे काही नाही, ही तर फक्त अर्धवट विचारांची कालवाकालव, असे मला वाटते जेव्हा "ती" येते... एकमेकांच्या कानात गुणगुण करण्याऐवजी मुलगा असो वा मुलगी एखाद्याने तिची मदत केली तर काय बिघडते, शाळा किंवा कॉलेज मध्ये असताना अचानक जेव्हा "ती" येते... लपवावे लागतात ते कपड्यावरील डाग जेव्हा Bleeding चे प्रमाण झालेले असते Excess पण मी म्हणते, पाहणार्यांना माहीत नसते का, की असते ती एक Natural Body Process; वाईट ते डाग नाही, वाईट त्या लोकांची नजर असते जेव्ह...

..‌तरीही तुम्ही म्हणता स्त्री कमजोर आहे!

 "नऊ महिने गर्भात वाढवून, असह्य वेदना सहन करून, बाळाला जन्म देणारं फक्त तिचचं उदर आहे आणि तरीही तुम्ही म्हणता स्त्री कमजोर आहे!" "इंग्रजांविरुद्ध आणि आपल्या लोकांसाठी लढणारी ती झाॅंशीची राणी आजही इतिहासात अमर आहे, आणि तरीही तुम्ही म्हणता स्त्री कमजोर आहे!" "कुटुंबासमोर येणाऱ्या प्रत्येक संकटांशी लढणारी ती एक धारदार तलवार आहे, आणि तरीही तुम्ही म्हणता स्त्री कमजोर आहे!" "मुलींच्या हक्कासाठी लढणारी आणि स्त्री शिक्षणाचं बियाणं पेरणारी ती सावित्री आजही प्रत्येक मुलीच्या नजरेसमोर आहे, आणि तरीही तुम्ही म्हणता स्त्री कमजोर आहे!" "एकाच घरात राहून, दोन्ही घरांच्या सुख समृद्धीवर लक्ष ठेवणारी फक्त तिचीच नजर आहे, आणि तरीही तुम्ही म्हणता स्त्री कमजोर आहे!" "प्रत्येक पुरुषाच्या प्रगतीमागे उभी असणारी ती एक खंबीर आधार आहे, आणि तरीही तुम्ही म्हणता स्त्री कमजोर आहे!" "अन्यायासाठी ती काली आणि घरात आनंद आणणारी ती साक्षात लक्ष्मी चा अवतार आहे, आणि तरीही तुम्ही म्हणता स्त्री कमजोर आहे!" "खरं तर कमजोर ती नाही, तिचं सामर्थ्य ओळख...